‘वणवामुक्त गाव’ स्पर्धेसाठी चिपळूणातील १६ गावांची निवड

0

चिपळूण : कोकण परिसरात वणव्याचा प्रश्न हा गंभीर प्रश्न असून वणवामुक्त कोकण संघटनेच्या माध्यमातून कोकणातील वणव्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या मोहिमेंतर्गत संघटनेतर्फे वणवामुक्त गाव ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यातील प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या गावाला पुरस्कार ट्रॉफी व २५ हजार रुपये रोख असे देवून गौरविण्यात येणार आहे. तर द्वितीय आणि तृतीय क्रमांकांसाठी देखील रोख बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. या वणवामुक्त गाव स्पर्धेसाठी चिपळूणलगतच्या १६ गावांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये टेरव, खेर्डी, कळंबस्ते, धामणवणे, कापसाळ, कामथे, कळवंडे, धामणदेवी, पेढे, परशुराम, मिरजोळी, वालोटी, शिरळ, भागाडी, पाचाड, कालुस्ते या गावांचा समावेश आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:31 PM 19-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here