जिल्हा परिषद अध्यक्षपद : राजकीय घडामोडींना वेग; उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत पाली निवस्थानाहून निघाले

0

🔳 भास्कर जाधव उदय सामंतांच्या संपर्कात

🔳 आयत्यावेळी काही बदल होण्याची दाट शक्यता

रत्नागिरी : जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या उमेदवारी वरून राजकीय घडामोडींना आता वेग आला आहे. यासंदर्भातील अंतिम निर्णय खा. विनायक राऊत यांच्या सल्ल्याने; ना. उदय सामंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून घेणार असल्याची माहिती मिळत आहे. या चर्चेसाठी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री आपले निवासस्थान पाली येथून रत्नागिरीकडे यायला निघाले आहेत. आमदार भास्कर जाधव हे या निवडीबाबत ना. उदय सामंत यांच्या संपर्कात असल्याची माहिती देखील मिळत आहे. आज ११ वा. ३० मिनिटांनी १ अध्यक्ष, १ उपाध्यक्ष, ४ सभापती, ४ स्थाई समिती सदस्य यांची नावे जाहीर होणार आहेत. या निवडीत चुरस असल्याने आयत्यावेळी अनेक बदल होण्याची देखील दाट शक्यता आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
10:46 AM 22/Mar/2021

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here