एलईडी मासेमारी मर्यादित क्षेत्रासाठी पूर्णपणे बंद करा; उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचे निर्देश

0

रत्नागिरी : स्थानिकरीत्या पारंपरिक पद्धतीने तसेच रापण पद्धतीने मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांचे नुकसान होवू नये, यासाठी एलईडी मासेमारी पूर्णपणे बंद करा, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेळेआगर येथील मच्छीमारांच्या समस्यांबाबत सोमवारी रत्नागिरी येथून दृकश्राव्य प्रणालीद्वारे झालेल्या एका बैठकीत ते बोलत होते. बैठकीस आमदार राजन साळवी, सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांची उपस्थिती होती. या ठिकाणी १२ नॉटिकल माइल्सनंतर पुढील समुद्रात मासेमारी करण्याची मुभा पर्सेसीन मच्छीमारांना असली तरी ते किनाऱ्याजवळ येताना मासेमारी करीत असल्याने पारंपरिक मच्छीमारांचे नुकसान होत आहे. याकडे मत्स्यव्यवसाय विभागाने तातडीने लक्ष देऊन कारवाई करावी, असे सामंत म्हणाले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:33 AM 23-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here