मुंबई : राज्यातील महाविकासआघाडी सरकारच्या अडचणीत गेल्या अनेक दिवसांपासून अनेक प्रकरणांमुळे मोठी वाढ झाली आहे. दरम्यान, राज्यात घडणाऱ्या या काही घटनांबाबत आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले आहे. यावेळी अजित पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी टाळलेल्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीबाबतही भाष्य केला आहे. ‘मुख्यमंत्र्यांनी आज महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांसहीत भेटण्यासाठी राज्यपालांकडे वेळ मागितला होता. कामकाजाची माहिती दिली जाणार होती. मात्र राज्यपाल हे सध्या बाहेर असल्याचे कळवण्यात आले आहे. त्यामुळे आता राज्यपाल जेव्हा भेटीची वेळ देतील तेव्हा भेट होईल’, असे अजित पवार म्हणाले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे वेळ का मागितली होती याबाबतही यावेळी अजित पवारांनी माहिती दिली आहे. अजित पवार म्हणजे, ‘साधारणतः राज्यात अशा काही घटना घडल्या कि मुख्यमंत्री राज्यापालांची भेट घेऊन त्यांना सविस्तर माहिती देत असतात. तशी परंपराच आहे’, असे अजित पवार म्हणाले. बुधवारी (२४ मार्च) राज्यातील या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर एक मंत्रिमंडळ बैठक देखील पार पडली. याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले कि, ‘पोलीस दलासंदर्भात करण्यात आलेल्या आरोपांबद्दल मुख्यमंत्र्यांनी मंत्रीमंडळाच्या सहकाऱ्यांची भूमिका जाणून घेतली आहे. मुख्यमंत्री या प्रकरणी जो काही निर्णय घेतील त्यामध्ये संपूर्ण मंत्रीमंडळ त्यांच्या पाठीशी असेल.’
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
3:38 PM 25-Mar-21