मुंबई : राज्यात कोरोना संसर्गाने गंभीर रुप धारण केलं आहे. काल राज्यात तब्बल 35 हजार 952 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली. तर 111 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वाढत्या कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी वेगाने लसीकरण होणे आवश्यक आहे. याच संदर्भात आता महाराष्ट्राला दिलासा देणारी बातमी आली आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी महाराष्ट्राला आवश्यकतेनुसार लसीचा पुरवठा करण्याचं आश्वासन दिलंय. केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्वीटद्वारे ही माहिती दिलीय. “केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन आणि राष्ट्रीय कोविड टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. विके पॉल यांच्याशी चर्चा केली, त्यांनी महाराष्ट्राला आवश्यकतेनुसार/प्रत्यक्षातील लसीकरणानुसार कोविड लसीचा पुरवठा करण्याचं आश्वासन दिलंय. माझी महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की त्यांनी आता लसीकरण सध्या आहे त्यापेक्षा दुप्पट करावं.” असं ट्वीट प्रकाश जावडेकर यांनी केलंय.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
04:49 PM 26/Mar/2021