मुंबई : फोन टॅपिंग प्रकरणी आता राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांनी खळबळजनक आरोप केला आहे. “रश्मी शुक्लांच्या चौकशीसोबतच सत्ता स्थापनेच्या काळात त्या अनेक आमदारांच्या संपर्कात होत्या. त्यामुळे त्याकाळातला त्यांचा सीडीआर तपासून पाहावा”, अशी मागणी हसन मुश्रीफ यांनी केली आहे. “राज्यात सत्ता स्थापनेच्या काळात २४ ऑक्टोबर २०१९ ते २४ नोव्हेंबर २०१९ पर्यंत सरकार स्थापनेच्या पूर्वसंध्येपर्यंत रश्मी शुक्ला अपक्ष आमदारांच्या संपर्कात होत्या. अपक्ष आमदार राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांनी दिली. कोट्यवधी रुपयांची ऑफर अपक्ष आमदारांना भाजपला पाठिंबा द्यावा, यासाठी शुक्ला ऑफर देत होत्या. त्यांच्यावर कारवाई होण्याची गरज आहे. पोलीस अधिकाऱ्यांचे हे कृत्य चुकीचं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कारवाई करावी”, अशी मागणी हसन मुश्रीफ यांनी केली आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:26 PM 26-Mar-21