रत्नागिरी : प्रतिवर्षाप्रमाणे श्री देव लक्ष्मीकेशवाच्या पालखीचा उत्सव साजरा करण्यात येणार होता. परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आणि मान. जिल्हाधिकारी साहेब रत्नागिरी यांनी कोकणातील शिमगोत्सवाबाबत निर्गमित केलेल्या अटीमुळे तसेच उत्सवासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन श्री देव लक्ष्मीकेशव मंडळ, मागलाड यांनी दि. ३ एप्रिल २०२१ रोजी श्री देव लक्ष्मीकेशवाचे पालखीचा उत्सव रद्द केला आहे. मात्र प्रतिवर्षाप्रमाणे पालखी घरे घेण्याचा कार्यक्रम शासन निर्गमित सुचनेनुसारच होईल. परंतु शासनाने निर्गमित केल्लेल्या अटींचे पालन करणे बंधकारक राहील, याची नोंद बाहेर गावी राहणारे ग्रामस्थ आणि भाविक यांनी घ्यावयाची आहे, असे मंडळाकडून कळविण्यात आले आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:06 AM 01-Apr-21