जनतेच्या मनातील मुख्यमंत्र्यांबद्दलची विश्वासार्हता कमी झालीय; मनसेचा पलटवार

0

मुंबई : राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि लॉकडाऊन होणार का, यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी रात्री राज्यातील जनतेला संबोधित केले. यावरून भाजपसह अन्य विरोधी पक्षांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी फेसबुक लाइव्ह करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. जनतेच्या मनातील मुख्यमंत्र्यांबद्दलची विश्वासार्हता कमी झाली आहे, असे देशपांडे म्हणाले आहेत. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री साहेब, तुमचं ऐकलं, आता आमचं ऐका… किंबुहना ऐकाच, असे म्हणत फेसबुक लाइव्ह केले. यावेळी त्यांनी कोरोना परिस्थिती, लॉकडाऊनची टांगती तलवार, आरोग्य यंत्रणा यांवर हल्लाबोल केला. आनंद महिंद्रा यांच्यावर केलेल्या टीकेचा समाचार घेत, कोरोना संकटाच्या काळात अनेकांनी सरकारला जनतेला मदत केली. कोरोनाचे प्रमाण, प्रादुर्भाव कमी झाला. तेव्हा सरकारने अनेकांना नोकरीवरून काढून टाकले. मग आता पुन्हा लोकांना कसे बोलावणार, असा सवाल करत गरज संपल्यावर त्यांना सरकारने लाथाडले आणि पुन्हा आरोग्य सेवक कमी पडताहेत म्हणून मुख्यमंत्री सांगताहेत. लोकांनी विश्वास कसा ठेवावा. लोकांच्या मनातील मुख्यमंत्र्यांबद्दल विश्वासार्हता कमी झाली आहे, अशी टीका देशपांडे यांनी केली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:47 PM 03-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here