“उच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागत, गृहमंत्र्यांनी शक्य तितक्या लवकर राजीनामा द्यावा”

0

मुंबई : परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रामुळे राज्यात खळबळ उडाली होती. यासंदर्भात परमबीर सिंग यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयात सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान या प्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. यावरून आता पुन्हा एकदा राजकारण तापले असून, उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत असून, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी पुन्हा एकदा भाजपकडून करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोप प्रकरणी उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे स्वागत करतो. गृहमंत्र्यांनी पदावर असताना CBI चौकशीला सामोरे जाता कामा नये. त्यामुळे त्यांनी शक्य तितक्या लवकर राजीनामा द्यावा. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात वसुली प्रकरणाचा उल्लेख केला होता, असे नितेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:38 PM 05-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here