नवी दिल्ली : भारतात कोरोना साथरोगाची दुसरी लाट आल्यानंतर पहिल्यांदाच दिवसभरात एक लाखांहून अधिक रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे केंद्र सरकारने हा विषय गंभीरपणे घेतला असून यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 एप्रिल रोजी संध्याकाळी 6.30 वाजता मुख्यमंत्री आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. तत्पूर्वी केंद्रीय आरोग्य मंत्री मंगळवारी 11 राज्यांच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधतील. देशातील कोरोना रुग्णसंख्या जास्त असलेल्या राज्यांशी शुक्रवारी झालेल्या बैठकीत चर्चा केली. यामध्ये 11 राज्यांची गंभीर स्थिती असणारी राज्य म्हणून वर्गवारी करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, केरळ, छत्तीसगड, चंदीगढ, गुजरात, मध्यप्रदेश, तामिळनाडू, दिल्ली आणि हरियाणाचा समावेश करण्यात आला आहे. या राज्यांमध्ये गेल्या 14 दिवसांमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक वेगानं कोरोन रुग्णसंख्या वाढत आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:04 PM 06-Apr-21