रत्नागिरीतील व्यवसायिकाचे भिकमांगो आंदोलन

0

रत्नागिरी : सरकारने लागू केलेल्या लॉकडाऊन ला व्यापाऱ्यानी विरोध केला आहे. नवे नियम हे पूर्णपणे हास्यास्पद असून हे बंद तर ते चालू असे करून कोरोनाचे संक्रमण कसे रोखणार असा प्रश्न विचारला जात आहे. मागील लॉक डाऊन मध्ये नोकरांचे पगार, बँकांची कर्ज भरताना आधीच व्यावसायिक उध्वस्त झालेला असताना शासनाने ही नवी नियमावली जाहीर केली आहे. यामुळेच आपला विरोध प्रकट करण्यासाठी शासनाच्या नियमानुसार आपले दुकान बंद करीत रत्नागिरीतील सुप्रसिद्ध फोटोग्राफर कांचन मालगुंडकर यांनी दुकानाबाहेर भिकमांगो आंदोलन केले आहे. सरकारने या नव्या नियमांचा पुनर्विचार नाही केला तर प्रत्येक व्यवसायिकावर ही पाळी येणार आहे. कांचन मालगुंडकर यांचे हे आंदोलन अतिशय बोलके असून शासनाच्या डोळ्यात अंजन घालणारे आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
03:59 PM 06/Apr/2021

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here