देवरूख : संगमेश्वर, देवरूख व साखरपा या महत्त्वाच्या राज्य मार्गावर लेझ्यर पॉईंट याठिकाणी अपघात थांबवण्यासाठी गतिरोधक टाकण्याची मागणी होत आहे. यामार्गावर सुसाट वेगात वाहतूक सुरु आहे. मात्र कोसुंब मारुती मंदिरनंतर थेट साडवली वनाझ कंपनी वगळता मध्ये कुठेही गतिरोधक नसल्याने या मधल्या भागात विशेषतः हॉटेल लेझ्यर पॉईंटसमोर अपघातांची संख्या वाढत निघाली आहे. या भागात गतिरोधक बसवा, अशी मागणी वारंवार करूनसुद्धा बांधकाम विभाग याकडे लक्ष देत नसल्याने वाहन चालकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:20 PM 06-Apr-21