रत्नागिरी : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने नियमावली जारी केली असून या नियमावलीनुसार अत्यावश्यक सेवा सोडून इतर सर्व दुकाने बंद असणार आहेत. याबाबत पोलीस प्रशासनाने आजपासून कारवाईला सुरुवात न करता रिक्षा फिरवून जागृती मोहीम राबवली. मात्र उद्यापासून अशा उघड्या असणाऱ्या दुकानांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती रत्नागिरीचे डीवायएसपी सदाशिव वाघमारे यांनी दिली आहे. आज त्यांनी या संदर्भात माहिती देण्यासाठी व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून घेतले. यावेळी शहर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी, जिल्हा वाहतूक निरीक्षक शिरीष सासने, व्यापारी महासंघाचे तालुकाध्यक्ष निखिल देसाई, शहराध्यक्ष गणेश भिंगार्डे व पदाधिकारी उपस्थित होते.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
08:38 PM 06/Apr/2021