आंबा-काजूला हमीभाव देण्याची समविचारी मंचाची मागणी

0

रत्नागिरी : आंबा, काजू उत्पादकांना हमी भाव देऊन उत्पादित माल शासनाने खरेदी करावा, अशी मागणी महाराष्ट्र समविचारी मंचाने शासनाकडे केली आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात यावर्षी पर्यटकांची संख्या अल्प प्रमाणात आहे. त्यामुळे आंबा-काजूला मागणी कमीच आहे. दुसरीकडे बदलत्या हवामानाचा विशेषतः वाढत्या उष्णतेचा परिणाम आंबा पिकावर झाला आहे. लॉकडाउनच्या परिणामी उत्पादित माल पडून आहे. यासाठी कृषी उत्पन बाजार समिती, जिल्हा कृषी विभाग यांनी माल विक्रीसाठी पुढाकार घ्यावा आणि आंबा उत्पादनाला शासनाने ठोस हमीभाव देऊन माल विक्रीसाठी मदत करावी, अशी मागणी समविचारी मंचाने निवेदनाद्वारे केली आहे. शासनाने हेक्टरी नुकसानीचा तपशील न करता गुंठ्यावर करावा, तसेच ज्यांनी आंबा व्यवसायासाठी कराराने बागा घेतल्या आहेत, अशांचाही विचार शासनाने प्राधान्याने करावा, असे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे समविचारी मंचाचे बाबा ढोल्ये, राज्य सरचिटणीस संजय पुनसकर, राज्य युवा अध्यक्ष नीलेश आखाडे, जिल्हाध्यक्ष रघुनंदन भडेकर, महिला जिल्हाध्यक्ष जान्हवी कुलकर्णी, तालुकाध्यक्ष साधना भावे आदींनी हे निवेदन दिले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:29 PM 07-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here