मुंबई : कोरोनाच्या संकट काळात विद्यार्थ्यांचा अभ्यास तणावाखाली सुरू आहे. परीक्षेविषयी अस्वस्थता आहे, याची पूर्ण कल्पना सरकारला आहे. याबाबत शालेय शिक्षण विभागामार्फत मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, विविध पक्षीय लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी आदींसोबत चर्चा करत असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सोशल मीडियाद्वारे विद्यार्थी, पालकांशी संवाद साधताना दिली. विद्यार्थ्यांची सुरक्षा हीच सर्वप्रथम जबाबदारी असून शिक्षण विभाग या परिस्थितीचा आढावा घेत असून यासंदर्भात येत्या चार ते पाच दिवसांत निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:59 PM 10-Apr-21