अर्णव गोस्वामींच्या विरोधातील फौजदारी अब्रुनुकसानीच्या कारवाईची मागणी सत्र न्यायालयाने फेटाळली

0

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात आपल्यासह पोलीस दलाची बदनामी केल्याप्रकरणी रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या विरोधातील फौजदारी अब्रुनुकसानीच्या कारवाई करावी, अशी मागणी करणारा पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांचा अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळून लावला.

या अर्जात त्रिमुखे यांनी गोस्वामी यांच्यासह रिपब्लिक वाहिनीची मालकी असलेल्या एआरजी आऊटलिअर मीडिया कंपनी, कंपनीची संचालक तथा गोस्वामी यांची पत्नी यांच्यावरही कारवाईची मागणी केली होती. तसेच सुशांतच्या आत्महत्येच्या तपासाबाबत गोस्वामी अन्य प्रतिवादींनी समाजमाध्यमांवरून ट्विट करताना आपल्याबाबत चुकीची माहिती प्रसिद्ध केली, असा दावा त्रिमुखे यांनी केला होता. मात्र त्रिमुखे यांची ही तक्रार फौजदारी दंडसंहितेच्या कलम १९९ (२)नुसार दखल घेण्याच्या निकषांनुसार नाही, असा तांत्रिक मुद्दा न्यायालयाने उपस्थित केला. या कलमानुसार कर्तव्यावर असलेल्या सरकारी सेवकाविरोधात एखादा गुन्हा घडला असेल, तर तो दाद मागू शकत नाही असे नाही. त्यामुळे तक्रारदार या प्रश्नी कायदेशीर प्रक्रियेप्रमाणे योग्य मंचासमोर दाद मागू शकतो, असे स्पष्ट निर्देश न्यायालयाने सुनावणी दरम्यान दिले.

काय म्हटले आहे अर्जात…

त्रिमुखे यांनी अर्जात म्हटले आहे की, मुंबई पोलिस हे सुशांतच्या मारेकऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. अभिषेक त्रिमुखे हे अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या संपर्कात सातत्याने होते. ते तिला या प्रकरणातून वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे अनेक निराधार आरोप रिपब्लिक टीव्ही व रिपब्लिक भारत या वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून करण्यात आले. या वाहिन्यांवरील बातम्यांमध्ये आणि चर्चासत्रांमध्ये माझी बदनामी करण्यात आली. अनेक आक्षेपार्ह ट्विट्सही करण्यात आले. ऑगस्ट-२०२० मधील या बातम्या व चर्चासत्रांमध्ये माझा फोटो प्रसिद्ध करून बेछूट आरोप करत गोस्वामी यांनी अत्यंत दुष्ट हेतूने माझी व मुंबई पोलिस दलाची नाहक बदनामी केली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:35 PM 10-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here