रत्नागिरी : शासनाने कोरोना संक्रमण रोखण्यासाठी नव्या नियमावलीनुसार जमावबंदी आदेश काढले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळून इतर दुकाने देखील बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र रस्त्यावरील गर्दी; हटण्याचे नाव काही घेत नाही. कोरोना संसर्ग फैलावण्यासाठी गर्दी हे सर्वात महत्वाचे कारण मानले जाते. ही गर्दी टाळण्यासाठीच शासनाने दुकाने बंद ठेवली आहेत. मात्र शासनाचा हा उद्देश सफल होताना दिसत नाही. आज रत्नागिरीतील टिळक आळी, राधाकृष्ण नाका, राम आळी, जयस्तंभ, मारुती मंदिर, उद्यमनगर, साळवी स्टॉप आदी अनेक भागातील रस्त्यांवर ट्रॅफिक जाम झाल्याचे दिसून आले.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
4:33 PM 12-Apr-21