मराठी महिन्याची सुरुवात चैत्र महिन्यात गुढीपाडव्याच्या दिवसाने होते. चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो. मात्र यंदा कोरोनाचं संकट असताना गुढीपाडवा सण साधेपणाने साजरा करण्याचं आवाहन राज्य सरकारने केलं आले. राज्य सरकारने त्यासाठी एक नियमावली देखील जाहीर केली आहे.
गुढीपाडवा सणानिमित्त राज्य सरकारची नियमावली
गुढीपाडवा सण म्हटलं की मिरवणुका, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मित्र मैत्रिणींच्या भेटीगाठी हे दरवर्षी ठरलेले असतं. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमी राज्य सरकारने काही नियमांनुसार गुढीपाडवा सण साजरा करण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे. सरकारच्या नियमावलीनुसार सकाळी 7 ते सायंकाळी 8 पर्यंत साधेपणाने गुढीपाडवा सण साजरा करणे अपेक्षित आहे. कोणतीही मिरवणूक अथवा बाईक रॅली काढण्यास बंदी आहे. सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:52 PM 12-Apr-21