आंजर्ले गाव व्हाया बसफेरी सुरू करण्याची मागणी

0

दापोली : आंजर्ले गाव व्हाया एसटी बसफेरी सुरू करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. याबाबत दापोली एसटी आगार व्यवस्थापक रेश्मा मधाळे यांच्याकडे संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, आंजर्लेकडून पाडले, आडे, केळशीकडे जाणारा मार्ग हा नादुरूस्त झाला असल्याकारणाने या मार्गावरून एसटी बसमधून प्रवासी वाहतूक करणे धोक्याचे आहे. त्यामुळे पुढे केळशीकडे जाणाऱ्या एसटी बस या आंजर्ले गावात नेल्या जात नाहीत. जर आंजर्लेत घेऊन गेलो तर केळशीकडे जाणाऱ्या प्रवाशांना नियत ठिकाणापर्यंत जाण्यासाठी आणखी १० रुपयांचा जादा आकाराचा आर्थिक भुर्दंड पडतो. यासाठी केळशीकडील जाणाऱ्या प्रवाशांची ओरड होते. याकरिता हा प्रश्न निर्माण झाला आहे. जोपर्यंत आंजर्ले मार्गाची दुरुस्ती होत नाही तोपर्यंत आंजर्लेकडून एसटी बस सोडल्या जाणार नाहीत. मग त्यासाठी जर या मार्गावरील स्थानिक ग्रामपंचायतीने आंजर्ले व्हाया करण्यास संमती दिली तर एसटी बस व्हाया आंजर्ले करण्यास हरकत नाही. मात्र, अद्यापही तसे पत्र कोणीही आणून न दिल्याने हा प्रश्न निर्माण झाला आहे

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:03 PM 13-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here