बेशुद्धावस्थेतील विवाहितेचा रुग्णालयात मृत्यू

0

रत्नागिरी : तालुक्यातील निवळी येथील आंबा बागेत विवाहिता बेशुध्दावस्थेत आढळली. तिला उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ही घटना सोमवारी सकाळी ७ वा. सुमारास घडली. मनीषा करण गौतम (२०, रा. जोशीवठार निवळी, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे. या बाबत बाग मालक गजानन श्रीराम जोशी (५१, रा.जोशीवठार निवळी,रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या आंबा बागेत करण गौतम हा पत्नी मनीषासोबत बागेत देखभालीचे काम करत होता. १२ एप्रिल रोजी सकाळी ७ वा. समारास करणने पत्नी मनीषाला उठवण्याचा प्रयत्न केला असता तिने कोणतीही हालचाल केली नाही. म्हणून करणने ही बाब बाग मालक गजानन जोशी यांना सांगितली. त्यांनी तातडीने तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले. सायंकाळी उशिरापर्यंत मृतदेहाचे शवविच्छेदन झालेले नसल्याने मनीषाच्या मृत्यूचे कारण समजू शकलेले नाही. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक पूजा चव्हाण करत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:06 PM 13-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here