“ज्यांना काम नाही त्यांनी घरात बसून वायफळ गोष्टी करू नयेत”

0

🔳 नगराध्यक्ष बंड्या साळवी यांचा बाळ माने यांना सणसणीत टोला

रत्नागिरी : “सामंत साहेब हे महाराष्ट्राचे नेते असल्याने संपूर्ण महाराष्ट्राकडे त्यांचे लक्ष आहे. असे असताना देखील ते आठवड्यातून दोन वेळा रत्नागिरीत येऊन परिस्थितीचा आढावा घेत आहेत. डॉक्टर, जिल्हाधिकारी, पोलीस यंत्रणा, आरोग्य यंत्रणा यांच्याशी चर्चा करीत आहेत व योग्य तो निर्णय घेत आहेत. लसींच्या तुटवड्याचा प्रश्न देखील सामंत साहेबांच्यामुळे क्षणार्धात सुटला आहे. त्यामुळे ज्यांना काम नाही त्यांनी घरात बसून वायफळ गोष्टी करू नयेत”. असा टोला नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी माजी आमदार बाळ माने यांना लगावला आहे. रत्नागिरीतील जनतेला वाऱ्यावर सोडून मंत्री उदय सामंत पंढरपूर वारीत दंग अशी टीका माजी आमदार बाळ माने यांनी काल केली होती. मंत्री सामंतांचे वागणे हे रोम जळत असताना निरोने फिडेल वाजविण्या सारखे आहे असेही वक्तव्य माने यांनी केले होते. यावर नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी आपल्या आक्रमक शैलीत सडेतोड प्रतिक्रिया दिली आहे. सामंत साहेबाना अनेक कामे असून संपूर्ण महाराष्ट्रावर त्यांचे लक्ष आहे. सामंत साहेब सोलापूरला आहेत पंढरपूरला आहेत अशा वायफळ गोष्टी करण्यापेक्षा एक माजी आमदार या नात्याने आरोग्य यंत्रणेला मदत केल्यास गोरगरिबांचे आपणाला पण आशीर्वाद मिळतील असा सल्ला देखील बंड्या साळवी यांनी बाळ माने यांना दिला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
01:17 PM 13/Apr/2021

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here