”रत्नागिरीमध्ये असे काय झाले की त्याठिकाणी कर्फ्यू लावला जात आहे ?” : निलेश राणे

0

रत्नागिरी : राज्याने दिलेल्या एसओपी नुसार महाराष्ट्रात सर्व गोष्टी सुरू असताना रत्नागिरीत असलेल्या कर्फ्यूकडे माजी खासदार नीलेश राणे यांनी लक्ष वेधले आहे. जिल्हा प्रशासनाने आरोग्य सेवा देण्यात आलेल्या अपयशाचे खापर रत्नागिरीच्या जनतेवर फोडू नये. राज्याने दिलेल्या नियमावलीप्रमाणे ज्या गोष्टी सुरू आहेत, त्या रत्नागिरीमध्येही सुरू राहिल्या पाहिजेत, असे राणे यांनी सांगितले. दोन दिवसांपूर्वी राज्य शासनाने कोव्हिडचा प्रतिबंधसाठी नवीन अध्याश जाहीर करत राज्यात संचारबंदी लागू केली आहे. मात्र रत्नागिरी जिल्ह्यात चक्क कर्फ्यू लावला गेला असून राज्य सरकारच्याच आदेशाची पायमल्ली जिल्हा प्रशासन करताना दिसत आहे. या गोष्टीकडे भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा माजी खासदार नीलेश राणे यांनी लक्ष वेधले आहे. राज्यात वेगळा नियम आणि फक्त रत्नागिरीसाठी वेगळा नियम असता कामा नये. ते म्हणाले की मुंबईत रिक्षा, रेल्वे, हॉटेल्स सुरू आहेत. तशी अन्य जिल्ह्यांतही आहेत. राज्याने दिलेल्या निर्देशानुसार ती सुरू आहेत. मग रत्नागिरीमध्ये असे काय झाले की त्याठिकाणी कर्फ्यू लावला जात आहे ? असा सवाल करताना जिल्हा प्रशासनाने आरोग्य यंत्रणा आधी सक्षम करण्याकडे लक्ष देण्याची सूचना राणे यांनी केली आहे.
ते पुढे म्हणाले की, करोनाचे पेशंट आकाशातून पडत नाहीत. त्यामुळे रत्नागिरीला वेगळी नियम लावण्याची गरज नाही. ज्या गोष्टी राज्यात सुरू आहेत त्या रत्नागिरीत बंद आहेत. ज्या गोष्टी महाराष्ट्रभर सुरू आहेत, त्या रत्नागिरीत सुरू झाल्या पाहिजेत. लोकांचा अंत आता पाहू नका, असा इशाराही राणे यांनी दिला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:23 PM 16-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here