‘भाजपचा खेळ खल्लास होणार’; फडणवीसांना बहुमत सिद्ध करण्यास फक्त 30 तास

0

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. उद्याच्या उद्या बहुमत चाचणी व्हावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. यावर भाजपचा खेळ खल्लास होणार, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे. राज्यातील घोडेबाजार थांबवण्यासाठी उद्याच बहुमताची चाचणी करण्यात यावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. उद्या 5 वाजेपर्यंत सगळ्या आमदारांची शपथ देण्यात यावी, असा आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. हंगामी अध्यक्षांची नियुक्ती करा. पाच वाजेपर्यंत आमदारांचा शपथ विधी पूर्ण व्हावा. त्यानंतर तातडीने विधीमंडळाच्या पटलावर बहुमत चाचणी व्हावी. गुप्त मतदानाने होणार नाही, लाईव्ह टेलिकास्ट करा, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. लोकशाही मूल्यांचं संरक्षण होणं आवश्यक आहे. लोकांना चांगलं सरकार मिळणं हा मुलभूत अधिकार असून, न्यायालयाला काही आदेश देणं गरजेचे आहे, असंही निकाल देताना सर्वोच्च न्यायलयाने म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here