१३ हजार ६०० कोटी रुपयांचा घाेटाळा करून फरार झालेला नीरव मोदी यांच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत माहिती देताना सीबीआय अधिकाऱ्याने सांगितले की, युकेच्या गृहमंत्र्यांनी नीरव मोदी यांच्या प्रत्यार्पणास मान्यता दिली आहे. त्यामुळे लवकरच नीरव मोदी भारताच्या ताब्यात येणार आहे नीरव मोदीला भारताकडे सुपूर्द करण्याबाबत लंडनच्या वेस्टमिंस्टर मॅजिस्ट्रेट कोर्टाने 25 फेब्रुवारी रोजी निर्णय दिला होता. या निर्णयानंतर नीरव मोदीला भारताकडे सुपूर्द करण्याचा मार्ग कोर्टाने मोकळा केला होता. त्यानुसार आता आज युनायटेड किंगडमच्या गृहमंत्र्यांनी नीरव मोदीला भारताकडे सुपूर्द करण्याला मंजूरी दिली आहे. याबाबतची माहिती भारतातील CBI च्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. पंजाब नॅशनल बँकेतील काही अधिकाऱ्यांच्या मदतीने तब्बल १३ हजार ६०० कोटी रुपयांचा घाेटाळा करून फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदीला भारतात पाठवले जाईल, हे अलीकडेच नक्की झाले होते. ब्रिटनच्या न्यायालयामध्ये प्रत्यार्पण खटल्यात मोदींच्या हाती अपयश आले होते. त्याच्यावरील आर्थिक घोटाळा आणि मनी लाँड्रिंगच्या आरोपात तथ्य आहे, असेही न्यायालयाने म्हटले होते.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
6:00 PM 16-Apr-21