संचारबंदीत शेतमाल विक्रीसाठी कोणतीही अडचण नाही : जिल्हाधिकारी

0

रत्नागिरी : ग्रामीण भागातून शेतमाल, भाजी, मिरची, आंबा तसेच आणि दूध या सामग्रीसंदर्भात नाक्यानाक्यावर अडवणूक होत आहे. परंतु हा माल विक्रीसाठी कोणतीही अडचण येणार नाही, तशा सूचना पोलीस अधीक्षकांमार्फत पोलीस कर्मचाऱ्यांना दिल्या जातील, अशी ग्वाही जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिल्याची माहिती भाजप द. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी दिली आहे.

करोना महामारीला प्रतिबंधित करण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ अभियान सुरू आहे. त्यातील एक उपाय म्हणून सर्वत्र निर्बंध घातले आहेत आणि त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे सुरू आहे. मात्र ग्रामीण भागात शेतकरी, बागायतदार, भाजी उत्पादक, दूध व्यवसायिक यांना या लॉकडाउन स्थितीचा मोठा फटका बसत आहे. पोलीस यंत्रणा ग्रामीण भागातील भाजी, शेतमाल, आंबा यांच्या वाहतुकीस अटकाव करत आहेत. रत्नागिरीतही भाजी विक्रेत्यांची दुकाने बंद आहेत. भाजीपाला प्रामुख्याने गावठी मिरच्या, पालेभाज्या, गवार, भेंडी, वालपापडी, मुळा भाजी नाशिवंत असते. ही भाजी वेळत विकली गेली नाही तर अशा उत्पादकांचे फार मोठे नुकसान होणार आहे. यावर्षी आंबा उत्पादनही अगदी कमी आहे. त्यामुळे आंबा व्यावसायिकही अडचणीत आहेत. आता हे पंधरा दिवस भाजी उत्पादकांसाठीही महत्त्वाचे आहेत. याच कालखंडात निर्बंध अनिवार्य झाले आहेत. त्यामुळे भाजी उत्पादक अडचणीत आले आहेत. ही सर्व समस्या गावागावांतील अनेक शेतकऱ्यांनी माझ्याकडे मांडली. त्यानंतर तत्काळ जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. करोनाविषयक दक्षता घेऊन ग्रामीण भागातील शेतमाल उत्पादक, भाजी उत्पादक यांच्यासाठी वेगळी व्यवस्था तात्काळ सुरू करावी, अशी विनंती केली. त्यावर शेतीमाल विक्रीसाठी अडवणूक होऊ नये, तशा सूचना देतो, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल्याचे अॅड. पटवर्धन म्हणाले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:43 AM 19-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here