कोरोनाची साखळी तोडण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार ‘ॲक्शन मोड’मध्ये, प्रशासनाला केल्या महत्त्वपूर्ण सूचना

0

राज्यात करोनाची वाढती संख्या लक्षात घेता कोरोनाची साखळी तोडण्यासाठी उपमुख् मंत्री अजित पवार यांनी कंबर कसली आहे. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या 5476 कोटींच्या मदत पॅकेजचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत तातडीने पोहोचला पाहिजे. त्यासाठी युद्धपातळीवर अंमलबजावणी करावेत. अशा सूचना आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी राज्यासाठी जाहीर केलेल्या मदत पॅकेज अंतर्गत देण्यात येणारी मदत संबंधित घटकांपर्यंत तात्काळ पोहोचवण्याच्या कार्यवाहीचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत आज झाला. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, ‘ जिल्हा वार्षिक योजनेतील 30 टक्के निधी आरोग्य सुविधांवर खर्च करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या अंतर्गत 3330 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात एक हजार 100 कोटी रुपयांच्या निधीचे वितरण झाले आहे. पहिल्या टप्प्यातील निधी करोना प्रतिबंधक उपाय योजना व उपचारासाठी खर्च करण्यात याव्यात उर्वरित निधीही गरजेनुसार तातडीने वितरित करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.

राज्यातील वाढती कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लावण्यात आलेला निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आर्थिक दुर्बल घटकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 5476 कोटी रुपये मदतीच्या पॅकेजची घोषणा केली आहे. या अंतर्गत अन्नसुरक्षा योजनेच्या सात कोटी लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती तीन किलो गहू, दोन किलो तांदूळ, देण्यात येणार आहे. यासाठी 90 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. निर्बंध काळात राज्यभर दररोज दोन लाख शिवभोजन थाळी मोफत देण्यात येणार आहे. यासाठी 75 कोटी रुपये उपलब्ध केले जातील

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
5:12 PM 19-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here