“हवं तर हात जोडतो, पण…”; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची नागरिकांना कळकळीची विनंती

0

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कडक निर्बंध लावले असतानाही कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. ठाकरे सरकारकडून अनेकविध उपाययोजना करताना दिसत आहे. कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेला कळकळीची विनंती केली आहे. कोरोनाची थोडी लक्षण दिसली, तरी तातडीने तपासणी करून घ्या, असे आवाहन टोपे यांनी केले आहे. आपण सर्वजण करोनाच्या महामारीशी लढत असल्याने काही महत्वाच्या सूचना मी देऊ इच्छितो. आपल्याला थोडी लक्षणे आढळली तरी चाचणी करुन घ्यावी. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, उपचार करा. कोणत्याची परिस्थितीत अंगावर दुखणे अंगावर काढू नये, असा सल्ला टोपे यांनी यावेळी दिला.

कृपया दुखणे अंगावर काढू नका
जिल्ह्या-जिल्ह्यांमध्ये जो अभ्यास दिसतो तो एकच दाखवतो की, उशीर झाल्याने रुग्ण दगावला, त्यामुळे कृपया दुखणे अंगावर काढू नका, असेही टोपे यांनी म्हटले आहे. कोणत्याही परिस्थितीत लसीकरणास महत्व द्या. कोरोना महामारीत सुरक्षित ठेवण्यात लस महत्वाची कामगिरी बजावणार आहे. त्यामुळे जरी तुम्हाला बीपी, डायबेटीज, किडनी, ह्रद्य काहीही आजार असला तरी लस लाभदायी आहे. त्यामुळे सर्वांनी लसीकरण करून राष्ट्रीय कार्यक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन टोपे यांनी केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:39 PM 21-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here