साखरपा : साखरपा येथील बाजारपेठेतील मुख्या रस्त्याच्या पॅचिंगच्या कामाला प्रारंभ झाला आहे. या रस्त्याची फारच दुरावस्था झाली होती. त्याबाबत स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी आवाज उठवला होता. साखरपा बाजारपेठेतील मुख्य रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली होती. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहने चालविणेच काय पण साधे चालणेही अवघड झाले होते. हा रस्ता जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येतो. रस्त्याची दुरवस्था लक्षात घेऊन स्थानिक भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आवाज उठवला होता. त्याचीच दाखल घेत माजी केंद्रीय मंत्री व खासदार सुरेश प्रभू यांनी मंत्री अशोक चव्हाण यांना पत्र पाठवून हा रास्ता दुरुस्त व्हावा, अशी मागणी केली होती. त्याची दाखल घेण्यात आली आहे. मागील आठवड्यात या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी खडी आणि अन्य साहित्य आणण्यात आले. गेले दोन दिवस खड्डे भरण्याच्या पॅचिंगच्या कामाला प्रारंभ झाला आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:52 PM 23-Apr-21