हरियाणा : देशभरात करोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यात करोना रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाणही वाढलं आहे. यावरून सरकारला लक्ष्य करण्यात येत आहे. आरोग्य सुविधा पुरविण्यात अपय़शी ठरल्यामुळे मृत्यू झालंच समोर येत आहे. यावरून हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. मुख्यमंत्री खट्टर म्हणाले की, सध्याची वेळ आकडेवारीवर लक्ष देण्याची नाही. आता ज्यांचा मृत्यू झाला, ते थयथयाट केल्याने जिवंत होणार नाहीत. ही नैसर्गिक आपत्ती असून त्यात आपण काही करू शकत नाहीत, असंही खट्टर म्हणाले. ते पुढं म्हणाले की, आम्हाला डेटासोबत खेळत बसायच नाही. लोक कसे बरं होतील. त्यांना कसा दिलासा मिळेल, त्याकडे आमचं लक्ष असल्याचं खट्टर यांनी नमूद केलं. मात्र जे मेलेत ते गोंधळ घातल्याने परत येणार नाहीत. आता लोकांना वाचविण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवा. त्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज असल्याचं त्यांनी नमूद केल.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:26 PM 27-Apr-21