रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील अखेरच्या स्वातंत्र्यसैनिक आशाताई पाथरे यांचे आज, २७ एप्रिल रोजी वार्धक्याने निधन झाले. गेल्या १५ मार्च रोजी त्यांनी वयाची शंभर वर्षे पूर्ण करून १०१ व्या वर्षात पदार्पण केले होते. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या “चले जाव” चळवळीत १९४२ साली त्यांनी सांगलीतील विलिंग्डन महाविद्यालयात असताना आणि पुण्यात मिनू मसानी यांच्या नेतृत्वाखालील मोर्चात भाग घेतला होता. त्याबद्दल त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. गेली सात वर्षे त्या जामनगर येथे त्यांच्या कन्या अरुंधती राजा यांच्याकडे राहत होत्या. तेथेच त्यांचे आज दुपारी साडेबारा वाजता निधन झाले. रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजाभाऊ लिमये यांनी श्रीमती पाथरे यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:49 PM 27-Apr-21