चिपळूण : शहरातील खेंड-कांगणेवडी रस्त्याजवळील रसाळ चाळ येथे पथदीप बसवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत चिपळूण नगर परिषदेने हे पाऊल उचलले आहे. रसाळ चाळ येथील नागरिकांना अंधारातून मार्ग काढावा लागत असल्याने येथील नागरिकांनी पालिकेकडे पथदीप बसवण्याची मागणी केली होती. गेल्या १२ वर्षांपासून हे काम रखडले होते. युवासेना विभागप्रमुख नीलेश आवले यांनी मुख्याधिकरी डॉ. वैभव विधाते यांची भेट घेऊन पथदीप बसवण्याची मागणी केली होती. त्यानंतर पथदीप विभागाचे प्रमुख महाडिक यांनी या भागाची पाहणी करून लवकरच पथदीप बसवण्यात येतील, असे आश्वासन दिले.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:24 PM 28-Apr-21