रत्नागिरी : प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार कोकणासह रत्नागिरी जिल्ह्यात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहणार आहे. आगामी पाच दिवस कमाल ते किमान तापमानात वाढ होण्याची अटकळ हवामान विभागाने वर्तविली आहे. पुढील तीन ते चार दिवसांत दिवसाच्या कमाल तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मात्र कमाल आणि किमान तापमानात घसरण होण्याची शक्यता आहे. पूर्वमोसमीसाठी ही वातावरणीय स्थिती अनुकूल राहणार असून मोसमी पावसाच्या चाहलीने तापमानात उतार राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यानच्या, काळात तापमानाचा पारा चाळिशीत जाण्याची चिन्हे आहेत. निरभ्र आकाशाच्या स्थितीमुळे तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे उन्हाच्या झळापासून सावधान रहा, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:32 AM 30-Apr-21