रत्नागिरी : कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे लसीकरणाला गर्दी होत आहे; मात्र लस उपलब्ध होत नाही. दुसरा डोस घेण्यासाठीच 25 हजाराहून अधिक लाभार्थी आहेत. तुलनेत गुरुवारी (दि. 29) अवघे पाच हजार डोस प्राप्त झाले. त्यामुळे प्रशासनाने दुसऱ्या डोससह पहिल्या डोससाठी फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना प्राधान्य द्या असे आदेश दिले आहेत.
जिल्हा, राज्य आणि देशात कोरोनाने धुमाकुळ घातला आहे. या परिस्थितीत नागरिकांना कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशींचा आधार आहे. शासनाने 18 वर्षांवरील सर्वांनाच लस दिली जावी असे आदेश आहेत. सध्या जिल्ह्याला मिळणारी लस अत्यंत अपुरी असल्याने वितरण करणे अशक्य होत आहे. गुरवारी एकाच दिवसात पाच हजार जणांनी लस घेतली. तसेच आतापर्यंत जिल्ह्यातील 1 लाख 60 हजार 235 जणांना लस देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात लस घेतलेल्या लोकांना दुसरा डोस देणे अत्यावश्यक आहे. गेल्या आठ दिवसातील 25 हजाराहून अधिक लोकांना दुसरा डोस द्यावयाचा आहे. त्यासाठी पुरेशी लस मिळत नाही. अनेकांना लसीकरण केंद्रावरुन माघारी परतावे लागत आहेत. काल मिळालेली पाच हजार जिल्ह्यातील 121 केंद्रांवर रातोरा वितरीत करण्यात आली. त्यासाठी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनाची तारांबळ उडाली होती. त्यामुळे सकाळच्या सत्रात केंद्रांवर लसीकरण सुरु करता आले. दोन दिवसापुर्वी लसच नसल्यामुळे मोहीमेला एका दिवसासाठी स्थगिती दिली गेली होती. लसीचा तुटवडा असल्यामुळे जिल्हाप्रशासनाने लसीकरणाविषयी आदेश काढले आहेत. त्यात पहिला डोस फक्त फ्रंट लाईन वर्कस्ना म्हणजेच आरोग्य, पोलिस, महसूल व पंचातयराज व्यवस्थेतील लोकांना प्राधान्याने दिले जावे. दुसऱ्या डोसमध्येही त्यांनाच लस दिली जावी असे आदेशात नमुद केले आहे. दापोली तालुक्यात पंचायत राज व्यवस्थेतील कर्मचाऱ्यांना प्रथम लस द्यावी. शिल्लक राहील्यास उर्वरितांना म्हणजेच एसटी महामंडळ, महावितरण, बँक कर्मचारी यांचा विचार करावा. त्यामध्येही प्रत्येकवेळी संख्या निश्चित केली आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:09 PM 03-May-21