मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत आहेत. पण महाराष्ट्र सरकारने या साथीचा आटोक्यात आणण्यासाठी विविध उपाय योजले आहेत. राज्यात लसीकरणाचा वेगही वाढवला आहे. राज्यात 1 कोटी 37 लाखांपेक्षा अधिक लोकांचे लसीकरण करून महाराष्ट्र लसीकरणात देशात अग्रस्थानी आहे, अशा शब्दांत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाविकास आघाडीचे कौतुक केले आहे.
कोरोना काळात आर्थिक दुर्बल घटकांना दिलासा देण्यासाठी पाच हजार 476 कोटी रुपयांच्या मदतीचे पॅकेज जाहीर केल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. महाराष्ट्र दिनानिमित्त राजभवनावर आयोजित सोहळ्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यपालांनी महाराष्ट्रातील जनतेला संदेश दिला. तेव्हा महाविकास आघाडीच्या विविध योजनांचा आढावा घेत राज्य सरकारच्या कामगिरीचे त्यांनी कौतुक केले.
यावेळी त्यांनी गरीबांना मोफत शिवभोजन थाळी, महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न, शेतकऱयांना वीज बिल सवलत अशा विविध योजनांचा आढावा घेतला.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:12 PM 03-May-21