आरवली : रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई, पुणेसारख्या परजिल्ह्यातून येणाऱ्यांच्या अँटिजन चाचण्या करण्यात येत नाहीत, तसेच गृह विलगीकरण करण्याकडेही दुर्लक्ष करण्यात येत असल्याने स्थानिक ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तालुक्यात रेल्वे तसेच खासगी वाहनांनी हजारो लोक दाखल झाले आहेत. या येणाऱ्या अनेक लोकांची कोणतीच आरोग्य तपासणी, चाचणी झालेली नाही. तसेच या लोकांना गृह विलगीकरण करण्यात न आल्याने हे आलेले लोक सर्रास गावामध्ये वावरत आहेत. परजिल्ह्यातून येणाऱ्यांची कोणतीच माहिती ग्रामपंचायत आणि ग्राम कृतीदलाला देण्यात येत नाही. मागील लॉकडाऊन काळात अशा लोकांची माहिती ग्रामपंचायतीला देण्यात येत होती, मात्र आता अनेक नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:00 PM 03-May-21