पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत येत्या २३ मे रोजी इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येणार होती, परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मे महिन्यात कोणत्याही ऑफलाईन परीक्षेचे आयोजन करण्यात येऊ नये, असे स्पष्ट आदेश केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयाने दिले आहेत, तर राज्य शासनाकडून १३ जूनपर्यंत प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षांबाबत अनिश्चितता आहे. दरवर्षी फेब्रुवारीत शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते. यंदा ही परीक्षा २५ एप्रिलला होणार होती; परंतु कोरोनाच्या संकटामुळे ती २३ मेपर्यंत पुढे ढकलली आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:15 PM 05-May-21