माल वाहतुकीमुळे एसटीला २ कोटी २७ लाखांचे उत्पन्न

0

रत्नागिरी : कोरोनामुळे गतवर्षी एसटी वाहतूक तब्बल दोन महिने बंद होती. निर्माण झालेल्या बिकट आर्थिक परिस्थितीवर मार्ग शोधत असतानाच महामंडळाने मालवाहतुकीसाठी परवानगी दिली. यावर्षी पुन्हा लॉकडाऊनचा सामना करावा लागत आहे. एसटी साठी अत्यावश्यक सेवा म्हणून परवानगी देण्यात आली असली तरी प्रवासी भारमान घटल्यामुळे उत्पन्नावर परिणाम झाला आहे. मात्र, मालवाहतुकीमुळे राज्य परिवहन महामंडळाला दिलासा प्राप्त झाला आहे. गतवर्षी जिल्ह्यात दि.२१ मेपासून मालवाहतुकीला प्रारंभ झाला. कोरोना कालावधीत आंबा वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला असताना एसटीच्या मालवाहतूक गाडीतून पेट्यांची वाहतूक करण्यात आली. ५० मालवाहतूक बसद्वारे गेल्या अकरा महिन्यांत ४ लाख ७८ हजार किलोमीटर प्रवास झाला असून, त्याद्वारे दोन कोटी २७ लाख ८५ हजार रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. एसटीने माल वाहतूक सुरू करण्यासाठी परवानगी मिळाल्यानंतर टप्प्याटप्प्याने वाहतूक सुरू झाली. एसटीच्या विश्वासार्हतेमुळे कारखानदार, व्यापारी, शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद लाभत आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:54 PM 05-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here