रत्नागिरी : शहरानजीकच्या मिरजोळे-पाटीलवाडी येथील बेकायदेशीर दारू अड्यावर शहर पोलिसांनी धाड टाकून १८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई बुधवारी सायंकाळी ४.५० वा. सुमारास करण्यात आली असून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस हेड कॉन्स्टेबल बाळ पालकर यांनी तक्रार दिली असून होती. त्या आधारे पोलिसांनी ही कारवाई करत १६ हजार रुपयांचे ८०० लिटर गूळ आणि नवसागरमिश्रित रसायन आणि २ हजार १०० रुपयांची गावठी हातभट्टीची ४० लिटर दारू जप्त केली. याचा अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:58 PM 07-May-21
