“भारताला कोरोनाचा सामना करण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवणं आवश्यक; लष्कराचीही मदत घ्यावी”

0

सध्या देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित आढळत आहेत. अशा परिस्थितीत लसीकरण हा यावरीवल उपाय असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान भारतातील परिस्थितीत चिंताजनक असल्याचं मत जगातिल कोरोनाच्या जाणकारांपैकी असलेले दिग्गज Dr. ANTHONY FAUCI यांनी व्यक्त केलं. ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो. बायडेन यांचे मुख्य वैद्यकीय सल्लागारदेखील आहेत. “भारताला मर्यादित कालावधीसाठी लॉकडाऊन लावणं आवश्यक आहे. तसंच रुग्णालयांच्या उभारणीसाठी लष्कराचीही मदत घेतली पाहिजे. याशिवाय लसीकरण प्रक्रिया वेगवान केली पाहिजे,” असं ते म्हणाले. “कोरोनाची साखळी तोडण्यासाठी भारतात दोन ते तीन आठवड्यांचा लॉकडाऊन आणि लसीकरणात तेजी ही उपयुक्त ठरू शकते. देशात लष्कराच्या मदतीनं फिल्ड रुग्णालये उभारून संक्रमण थांबवण्याचे प्रयत्न केले पाहिजे. वैद्यकीय उपकरणे घेऊन अमेरिकादेखील भारताची मदत करत आहे,” असंही ANTHONY FAUCI म्हणाले. CNN-News18 शी साधलेल्या विशेष संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:29 PM 07-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here