‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात 7 लाख 98 हजाराहूंन अधिक नागरिकांची तपासणी

0

रत्नागिरी : कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ हि मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात गृह भेटीतून नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आहे. आतापर्यंत मोहिमेत 7 लाख 98 हजार 856 जणांची तपासणी करण्याचे काम पूर्ण झाले असून यातून 597 कोविड पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यातील 230 जणांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. माझी रत्नागिरी माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात 770 पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. सध्या हि पथके घरोघरी भेटी देऊन नागरिकांची आरोग्य तपासणी करत आहेत. या अंतर्गत 2 लाख 26 हजार 414 घरांना भेटी देण्यात आल्या यातून एकूण 2 लाख 41हजार 446 कुटुंबातील 7 लाख 98 हजार 856 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. या भेटीदरम्यान नागरिकांची ऑक्सीमीटरवर ऑक्सीजन पातळी तपासण्यासह त्यांच्या शरीराचे तापमान तपासणे तसेच सहा मिनिटांची वॉक टेस्ट घेणे आदी तपासण्यांचा समावेश आहे. या तपासणी दरम्यान 33477 घरे बंद असल्याचे आढळून आली आहेत. मोहिमेत ग्रामस्थांना ६ मिनिटे चालायला सांगून ऑक्सिजनची पातळी तपासण्यात आली. चालण्याच्या तपासणीनंतर 95 पेक्षा खाली गेली अशांची एकूण संख्या 628 इतकी आढळली आहे. तर ताप सर्दी खोकला असणाऱ्या एकूण व्यक्तींची संख्या 1031 इतकी होती.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
10:32 AM 10-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here