”पाया पडतो पण रत्नागिरी जिल्ह्याला कोरोनापासून वाचवा…”

0

राजापूर : मी तुमच्या पाया पडतो.. पण महाराष्ट्राला रेमडेसिवीर व ऑक्सिजनचा पुरवठा करा, अशी केंद्राकडे साद घालणाऱ्या राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना लांजातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजन देसाई यांनीही अशीच साद घातली आहे. जिल्ह्यात गेल्या कित्येक वर्षात कोणतीच आरोग्य सेवासेवा सुविधा उपलब्ध न झाल्याने कोरोना संकटात जिल्ह्यात अनेकांचे उपचाराअभावी बळी जात आहेत. त्यामुळे मी तुमच्या पाया पडतो. चांगले डॉक्टर, चांगली आरोग्य सेवा आम्हाला द्या, कोरोना काळात ऑक्सिजन, रेमडेसिवीर आणि ऑक्सिजन बेडचा पुरवठा करा आणि रत्नागिरी जिल्ह्याला वाचवा, अशी साद त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना घातली आहे

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
12:35 PM 10-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here