रत्नागिरी : राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि संपूर्ण कोकण किनारपट्टी भागात मध्यम ते मुसळधार पावसासह ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहतील. 16 मेपर्यंत हे संकट डोक्यावर घोंघावेल, समुद्रात वादळ सदृश्यस्थिती निर्माण होत आहे. कोकण-गोवा किनाऱ्यावर सतर्कतेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.14 मे ते 16 मे 2021 या कालावधीत लक्षद्विप, केरळ, तामिळनाडू व कर्नाटक समुद्र किनाऱ्यावर पर्जन्यमान होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.तसेच 16 मे 2021 रोजी महाराष्ट्र-गोवा किनाऱ्यावर 40-45 ते 60 किमी प्रतीतास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे व या कालावधीत समुद्र खवळलेला राहणार आहे. सर्व मच्छीमार व समुद्र किनाऱ्यावरील गावे यांना सावधनतेचा इशारा देण्यात येत असून 15 मे व 16 मे 2021 या कालावधीत संबधितांना समुद्रात जाऊ नये असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रत्नागिरी यांनी आवाहन केले आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:21 AM 14-May-21