दहावी परीक्षेच्या निकालाचे सूत्र अद्याप ठरले नाही; राज्य सरकारची उच्च न्यायालयाला माहिती

0

मुंबई : दहावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणांचे मूल्यमापन कसे करायचे, याबाबत अद्याप सूत्र ठरले नसून लवकरच समिती याबाबत निर्णय घेईल, अशी माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला सोमवारी दिली. काेराेनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा राज्य सरकारच्या, सीबीएसई व आयसीएसई बोर्डाच्या निर्णयाला पुण्याचे रहिवासी व प्राध्यापक धनंजय कुलकर्णी यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. शाहरुख काथावाला व न्या. एस. पी.तावडे यांच्या खंडपीठापुढे होती. न्यायालयाने याचिकेची दखल घेत राज्य सरकारसह सीबीएसई व आयसीएसईला बुधवार, १९ मेपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:28 PM 18-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here