रत्नागिरी : तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी तालुक्यातील गावांना भेटी देऊन नुकसान झालेल्या घरांची पाहणी केली. ना. उदय सामंत यांनी आपतग्रस्त कुटुंबियांना तत्काळ मदत करण्याचे निर्देश प्रशासनास दिले होते. आज दुपारपर्यंत नुकसानग्रस्त भागांना शिवसेनेतर्फे मदत पोहचवणार असल्याचे मंत्री सामंत यांनी जाहीर केले. त्यानुसार ज्या ज्या ठिकाणी भेट दिली तिथे ना. उदय सामंत यांच्या पुढाकाराने शिवसेनेमार्फत मदतीला सुरुवात झाली आहे. पाली जि. प. गटात शिवसेनेचे पदाधिकाऱ्यानी आवश्यक वस्तूंचे वाटप करायला सुरुवात केली आहे. नाणीज, खानु, पाली, कापडगाव, हातखंबा, निवळी ह्या ठिकाणी वाटप संध्याकाळ पर्यंत पूर्ण होणार आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
1:39 PM 18-May-21