नवी दिल्ली : केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोव्याला तडाखा दिल्यानंतर सोमवारी गुजरातमध्ये शिरलेल्या ‘तौक्ते चक्रीवादळ’ अनेक जिल्ह्यांना धडकी भरवली. सोमवारी रात्री आणि मंगळवारी सकाळी गुजरातच्या राजकोट, अमरेली आणि आजुबाजुच्या परिसरात मुसळधार पाऊस सुरू होता. आता हे वादळ अहमदाबादच्या दिशेनं पुढे सरकलं असलं तरी या वादळाचा वेग मंदावल्यानं धोकाही कमी झालाय.
महाराष्ट्रात सर्वाधिक ११ मृत्यूंची नोंद
उल्लेखनीय म्हणजे गेल्या तीन दिवसांत पाच राज्यांतील २३ जणांचा ‘तौक्ते चक्रीवादळानं’ बळी घेतलाय. यातील सर्वाधिक म्हणजे ११ मृत्यूंची नोंद महाराष्ट्रात झालीय. यातील रायगड जिल्ह्यात ४, रत्नागिरीत २, ठाण्यात २ तर सिंधुदुर्ग आणि धुळे जिल्ह्यात प्रत्येकी एका मृत्यूची नोंद झालीय. महाराष्ट्रातील ६,३४९ गावांना तौत्के चक्रीवादळाचा फटका बसल्याचं अधिकृत आकडेवारी सांगतेय. या अगोदर सोमवार आणि रविवारी कर्नाटकच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांत पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली. तर गोवा आणि तामिळनाडूत प्रत्येकी २ – २ जणांना वादळात आपले प्राण गमवावे लागले.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:11 PM 18-May-21