एकही नुकसानग्रस्त पंचानाम्यातून सुटू नये : आ. भास्कर जाधव

0

गुहागर : वादळातील नुकसानग्रस्तांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून पंचनामे करावेत, असे सांगतानाच एकही नुकसानग्रस्त त्यातून सुटता कामा नये, याची काळजी प्रशासनाने घ्यावी, अशा सूचना आमदार भास्कर जाधव यांनी प्रशासनाला दिल्या. गुहागर पंचायत समितीच्या तौक्ते वादळ नुकसान आढावा बैठकीत आ. जाधव बोलत होते.गुहागर तालुक्यात १३४ घरे, ३ गोठे, जिल्हा परिषद शाळांचे ३रंगमंच, २ ग्रामपंचायत इमारती, २ सार्वजनिक शौचालये, २ स्मशानभूमी यांचे अंशत: नुकसान झाले आहे. एक कृषी पंप वाहून गेला आहे. ४ गुरे दगावली आहेत. १४ फळझाडांचे नुकसान झाले आहे. १ मच्छीमार बोट, १ गांडूळखताचा प्रकल्प यांचेही नुकसान झाले आहे. सुमारे ८५ हेक्टरवरील फळबागा आणि शेतीचे नुकसान झाले आहे. असा प्राथमिक अहवाल मंगळवारच्या बैठकीत ठेवण्यात आला

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:54 AM 19-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here