”उद्या निवडणुका घेतल्यास मोदी 400 जागा जिंकतील”

0

मुंबई : एकीकडे कोरोना संकटाचा सामना सर्वांना करावा लागत असताना दुसरीकडे मराठा समाजाला देण्यात आलेलं आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. त्यामुळे, मराठा समाजाने संताप व्यक्त केला असून आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील भाजपा नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी, टूलकीट व राहुल गांधींसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावरुन एकप्रकारे निवडणुकांचं आव्हानच दिलं आहे. देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत मंगळवारी भाजपची मराठा आरक्षणविषयक बैठक झाली. या बैठकीनंतर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना काँग्रेसचं ‘कथित’ टूल किट आणि राहुल गांधी पंतप्रधान मोदी यांच्यावर करत असलेल्या टीकेबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना आजही निवडणुका जिंकू, असा विश्वास व्यक्त केला. ‘पंतप्रधान मोदींना बदनाम करण्याचं षड्यंत्र रचण्यात येत असून उद्या निवडणुका घेतल्या तर मोदींना 400 पेक्षा जागा मिळतील,’ असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:50 PM 19-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here