रत्नागिरी : लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा देणाऱ्या औषध विक्रेते आणि त्यांच्या कुटुंबीयांना केंद्रच नव्हे तर राज्य शासनानेही कोव्हिड योद्ध्यांचा मान दिलेला नाही. इतकेच नव्हे तर लसीकरणातही प्राधान्य देण्याचे औदार्य दाखवलेले नाही. यामुळे औषध विक्रेत्यांच्या द महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनला आक्रमक भूमिका घ्यावी लागेल, असे संघटनेने म्हटले आहे. औषध विक्रेत्यांना व्यवसाय बंद ठेवण्याशिवाय पर्याय राहणार नाही. शासनाने या बाबत गंभीर दखल घ्यावी आणि राज्यातील औषधविक्रेते आणि त्यांच्या कुटुंबीयांना लसीकरणात प्राधान्य देण्याची मागणी अखिल भारतीय व महाराष्ट्र राज्य संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी पत्रकाद्वारे केली आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:22 PM 19-May-21