खेड : तौत्के चक्रीवादळामुळे खेड तालक्यातील शेतकरी, बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यांना तातडीने मदत द्या, आंबा बागायतदारांचे या पावसाने प्रचंड नुकसान झाल्याने त्यांना मदतीची नितांत गरज आहे. लॉकडाऊनमळे मजूर मिळत नाही. त्यामुळे हाताशी आलेले आंबा पीक घेता आले नाही. या पावसामुळे आंब्याची झाडे उन्मळून पडली आहेत. तर आंबे पडून गेल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशा शेतकऱ्यांना विनाविलंब मदतीचा हात द्या. शासनाने तत्काळ पंचनामे करावेत, अशी मागणी खेडचे माजी सभापती विजय कदम यांनी केली आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:46 PM 20-May-21