इन्फिगो आय केअर हॉस्पिटल तर्फे मधूमेहींच्या नेत्र विकारांसाठी २१ व २२ मे ला विशेष तपासणी

0

रत्नागिरी : सध्याच्या कोरोना काळात ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब या सारखे आजार असेल तर ते योग्य नियंत्रणात राहतील याची संपूर्ण काळजी प्रत्येकाने घ्यायची आहे. दैनंदिन कितीही काळजी घेतली तरीही बरेच वर्षांपासून शरीरात असणारा मधुमेह व अर्थातच रक्तातील अनियंत्रित साखर ही डोळ्यासारख्या महत्वाच्या अवयवाचे नुकसान करत असते. मधुमेही रुग्णांमध्ये विशेष करून रक्तातील अनियंत्रित साखरेचा परिणाम म्हणून डोळ्यातील दृष्टिपटल किंवा रेटिना याला सूज येणे, पडद्यावरती रक्तस्त्राव होणे, पडद्याला छिद्र पडणे यासारख्या समस्या उद्भवण्याची शक्यता काळानुसार उत्पन्न होते. परंतु आपल्या डोळ्यांची रेटिनाच्या तज्ञांकडून मधुमेही रुग्णांनी वर्षातून किमान दोनदा तपासणी करून घेतली तर या समस्या वेळीच लक्षात येतात. अशा समस्यांवर वेळीच उपचार केला तर रुग्णांचा बराचसा त्रास, पैसे व मधुमेहामुळे होणारा दृष्टिनाश लांबवता येतो किंवा आटोक्यात आणता येतो. मधुमेही रुग्णांनी हे सतत लक्षात ठेवले पाहिजे की प्रत्येक १५ मधुमेही व्यक्तींपैकी ७ ते ८ जणांना डोळ्याच्या पडद्याचे आजार व त्यामुळे गंभीर दृष्टिनाश होण्याची शक्यता सर्वाधिक असते. मधुमेहामुळे होणारा दृष्टिनाश व डोळ्यांची हानी ही कधीही संपूर्णपणाने बरी करता येत नाही तर ती वेळोवेळी उपचार करून फक्त नियंत्रणात ठेवावी लागते. इन्फिगो आय केअर हॉस्पिटल रत्नागिरी येथे ग्रीन लेझर, ३ डायमेन्शनल ऑप्टिकल टोपोग्राफी, फिल्ड अॅनालायझर, अर्टली मशीन अशी अत्याधुनिक निदान यंत्रणा असून या द्वारे रेटिनाच्या समस्यांची अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तपासणी केली जाते. हा विभाग रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातील एकमेव सुसज्ज विभाग आहे. दिनांक २१, २२ मे २०२१ रोजी इन्फिगोचे सुप्रसिद्ध रेटिना तज्ञ डॉ. प्रसाद कामत हे रेटिनाच्या रुग्णांची तपासणी १०-७ या वेळेत करणार आहेत. डॉ. प्रसाद कामत हे ‘शंकर नेत्रालय चेन्नई येथील उच्च प्रशिक्षित रेटिना तज्ञ असून त्यांनी आजपर्यंत मुंबई, पुणे, चेन्नई, अहमदाबाद, सुरत, नागपूर, रांची, लखनऊ, पाटणा येथील हजारो रुग्णांवर रेटिनाचे उपचार केले असून २० हजाराहून अधिक डोळ्यांच्या पडद्याच्या शस्त्रक्रीया यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. डॉ. प्रसाद कामत रत्नागिरी येथील इन्फिगो आय केअर हॉस्पिटल मध्ये मधुमेहाशी संबंधित रेटिनाच्या रुग्णांना वरील प्रमाणे २ दिवस पुर्वनोंदणी नुसार उपलब्ध असतील तरी रुग्णांनी आपली नावनोंदणी साठी ९३७२७६६५०४ या नंबर वर संपर्क साधावा. सध्याच्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे कोणाला प्रवासासाठी आवश्यक पत्राची गरज असल्यास नावनोंदणी केल्यावर इन्फिगो कडून प्रवासासाठी आवश्यक पत्र त्वरित पाठवले जाईल असे इन्फिगो आय केअर हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकुर यांनी सांगितले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:21 PM 20-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here